Description
संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर अवघ्या सहा महिन्यात मराठ्यांचे राज्य मोडले. औरंगजेबाला वाटले, मराठे आता संपले ! आणि.. अचानक एक भयंकर वादळ घोंघावू लागले. या वादळाने सत्तेच्या सागरावर तोऱ्यात तरंगणाऱ्या मोगल साम्राज्याच्या अवाढव्य जहाजाची शिडे फाडली, डोलकाठ्या मोडल्या. त्याच्या पताका नि छत्रचामरे चिरफाळून पराजयाच्या पर्वतप्राय लाटांवर नाचवत पुन्हा त्याने त्याला सागराच्या मध्यभागी नेऊन सोडले. त्यानंतर पुन्हा कधीही या जहाजाला यशाचा किनारा दिसलाच नाही. अखेर ते बुडाले.